कोल्हापूर हे महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील मोठे शहर आहे. येथील मुख्य भाषा मराठी आहे. येथील महालक्ष्मी अंबाबाईचे मंदिर हे महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. पंचगंगा इथली प्रमुख नदी आहे. शहराच्या आसपास पन्हाळा, गगनबावडा, नृसिंहवाडी, खिद्रापूर, विशाळगड, राधानगरी, दाजीपूर अभयारण्य आदी ठिकाणे आहेत. छत्रपती शाहूमहाराजांच्या काळात म्हणजेच १८७४ ते १९२२ मध्ये शहराचा मोठा विकास झाला. कोल्हापूर हे प्रसिद्ध क्षेत्र आहे.
इतिहास
खाद्यसंस्कृती
कोल्हापूर ठिकाण तांबडा आणि पांढरा रस्सा, मिसळपाव या खाद्यपदार्थांसाठी अतिशय प्रसिद्ध आहे. तसेच, कोल्हापूरची चप्पल ही खूप प्रसिद्ध आहे.आपुलकीची भावना ही इथल्या माणसांच्याकडे आहे. येथे मिसळपावपूर हे प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे. तसेच खाऊ गल्लीत राजाभाऊंची भेळ प्रसिद्ध आहे. "फडतरे" मिसळपाव प्रसिद्ध आहे.
पौराणिक
हिंदू धर्मशास्त्रानुसार, प्राचीन काळी केशी राक्षसाचा मुलगा कोल्हासुर हा इथे राज्य करीत होता. याने राज्यात अनाचार व सर्वाना त्रस्त करून सोडले होते. म्हणून देवांच्या प्रार्थनेवरून महालक्ष्मीने त्याच्याशी युद्ध केले. हे युद्ध नऊ दिवस चालले होते . आणि अश्विन शुद्ध पंचमीस महालक्ष्मीने कोल्हासूर या राक्षसाचा वध केला. त्यावेळेस कोल्हासूर महालक्ष्मीला शरण गेला आणि त्याने तिच्याकडे आपल्या नगराची कोल्हापूर व करवीर ही नावे आहेत तशीच चालू ठेवावीत असा वर मागितला. त्याप्रमाणे या नगरीला कोल्हापूर वा करवीर या नावाने ओळखले जाते. ["श्री करवीर निवासिनी"].
महालक्ष्मी
मध्ययुगीन
इ.स.पूर्व १ ल्या शतकापासून ते इ.स.च्या ९ व्या शतकापर्यतच्या ऐतिहासिक कालखंडात कोल्हापूर येथील वसाहत आजच्या ब्रह्यपुरीच्या टेकडीवर होती. ब्रह्यपुरीच्या टेकडातील अवशेषांचे अन्वेषण व उत्खनन असे दर्शविते की, सातवाहन काळात या परिसरात समृद्ध व सुसंस्कृत लोकसमुदाय वस्ती करून रहात होता. इ.स. २२५ ते ५५०पर्यत वाकाटक, कदंब, शेद्रक व मौर्य या प्राचीन राजघराण्यांचे राज्य होते. इ.स.५५० ते ७५३ या कालखंडात बदामीच्या चालुक्य घराण्याची सत्ता येथे प्रभावी होती.
इ.स.च्या १२ व्या शतकात कोल्हापुरात शिलाहारांचे राज्य होते. इ.स.१२१० मध्ये देवगिरीचा राजा सिंघणदेव याने कोल्हापुराच्या शिलाहार सम्राट भोजराजाचा पराभव केला. त्यानंतर देवगिरीच्या यादवांच्या एका प्रांताची राजधानी म्हणून कोल्हापूर अग्रेसर राहिले. १२९८ मध्ये देवगिरीच्या यादवांचा पराभव झाल्यानंतर १३०६-१३०७मध्ये कोल्हापूर शहरात मुसलमानी सत्तेचा अंमल सुरू झाला. कोल्हापूर या शहराला ऐतिहासिक राजधानी म्हणून ओळखले जाते.
मराठा साम्राज्य
देवगिरीच्या यादवांचा पराभव झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा मुलुख स्वराज्यात समाविष्ट करेपर्यंत कोल्हापूर पारतंत्र्यातच होते. शिवाजी महाराजांनी अफझलखानच्या वधानंतर २८ नोव्हेंबर १६५९ रोजी पन्हाळा हा किल्ला घेतला आणि कोल्हापूर शिवाजीच्या राज्यात समाविष्ट झाले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी यांच्या काळातील अनेक ऐतिहासिक घटनांचे कोल्हापूर हे साक्षीदार ठिकाण आहे.
त्यापैकी काही घटना :-
१ सिद्धी जोहरने पन्हाळ्याला वेढा देऊन शिवरायाना कोंडीत पकडले.
२ शिवा काशीद आणि बाजीप्रभू देशपांडे याच्या आत्मबलिदानाने ही भूमी पावन झाली आहे.
३ कोंडोजी फर्जंद आणि अण्णाजी दत्तो यांचा असामान्य पराक्रम याच भूमीत घडला.
४ दिलेरखानच्या गोटातून निसटून आलेल्या संभाजीमहाराज आणि शिवरायाच्या भावपूर्ण भेटीचा याच प्रदेशात झाली..
५ संभाजीराजास पकडणार्या कोल्हापूरचा ठाणेदार शेख निजामास संताजी घोरपडे यांनी याच मातीत धूळ चारली.
६ छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका पत्राने निराश होऊन रागाने बहलोलखानास पकडायला गेलेल्या सरसेनापती प्रतापराव गुर्जर आणि त्यांच्या सहा सहकार्यांचा भीमपराक्रम याच कोल्हापूरच्या भूमीत घडला.
[१]
कोल्हापूर संस्थान
शिवछत्रपतींच्या मराठा राज्याची इसवी सन १७०७ साली दोन तुकडे झाले . आणि कोल्हापूर आणि सातारा या दोन गाद्या अस्तित्वात आल्या. त्या पैकी कोल्हापूर संस्थानच्या अधिपती ह्या महाराणी ताराराणी बनल्या. पुढे जरी संपूर्ण भारत देशाबरोबर कोल्हापूर संस्थान जरी ब्रिटिश अधिपत्याखाली आले असले तरी कोल्हापूर संस्थानच्या अधिकारांना धक्का लागला नाही. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताच्या स्वातंत्र्यानंतर कोल्हापूर संस्थान देखील स्वतंत्र भारतात विलीन झाले.
शाहू कालीन सिंचन व्यवस्था
कोल्हापूर हे स्वतंत्र संस्थान असल्यामुळे या संस्थानयानासाठी स्वतची एक वेगळ्या प्रकारची व पर्यावरण पूर्वक सिंचन व्यवस्था वापरात होती व आज हि सिंचन व्यवस्था शहराच्या जुन्या भागात चालू असून त्याचा वापर खूप कमी प्रमाणात चालू आहे.या सिंचन व्येव्स्तेसाठी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर शहराच्या दक्षिण भागात कात्यायनी देवाच्या मंदिरात कुंड आहे तीतून नेसर्गिक पाण्याच्य झरा ला सुरवात होते तीतून ते कळंबा तलाव येथे आणले.तलावाचा व्यास मोठा असल्यामुळे तेथील पाण्याचा वापर जवळपासच्या शेतीसाठी केला जात होता व अजूनही होतो. तिथे महाराजांनी बंधारा बांधला जो जमिनीपासून पाच ते सहा फूट उंच ठेवला जेणेकरून त्या पाण्यामधे पाला पाचोळा केवा इतर काही जाऊन दुषित होऊ नये कळंब तलावातील पाणी त्या बंधाऱ्या द्वारे पाण्याचा खजिना या ठिकाणी आणले या साठी भौगोलिक परीस्तीती व गुरुत्वाकर्षण या गोष्टींचा विचार केला होता. पाण्याचा खजिना या ठिकाणी पाण्याचा साठा करून ते पूर्ण शहरात पुरवले जात होते. त्या पाण्यासाठी जमिनीखाली नलिका सुधा दगडाच्या बनविल्या होतय्या.
भूगोल
कोल्हापूर हे महाराष्ट्राच्या दक्षिणेला, पंचगंगा नदीच्या तीरावर वसलेले शहर असून ते मुंबईपासून ३७६ किमी, पुण्यापासून २३२ किमी, गोव्यापासून २२८ किमी आणि बंगलोरपासून ६६५ किमी अंतरावर आहे. कोल्हापूर सह्याद्रीच्या पश्चिम घाटमाथ्यावर असून त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ५६९ मी. (१८६७ फूट) इतकी आहे. राष्ट्रीय महामार्ग ४ इथून जातो.
प्रशासन
नागरी प्रशासन
महापौर - सौ. शोभा बोन्द्रे
उप महापौर - श्री. महेश सावंत
महानगरपालिका आयुक्त - डॉ.अभिजित चौधरी महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त - श्री. नितिन ना देसाई
जिल्हा प्रशासन
जिल्हाधिकारी -डॉ. अमित सैनी
अपर जिल्हाधिकारी - अजित पवार
निवासी उपजिल्हाधिकारी -. विक्रांत चव्हाण
जिल्हा पुरवठा अधिकारी - .विवेक आगवणे
उप विभागीय अधिकारी - .प्रशांत पाटील
तहसीलदार - .योगेश खरमाटे
निवासी नायब तहसीलदार - .रमेश शेंडगे
वाहतूक व्यवस्था
कोल्हापूर विमानतळ
कोल्हापूर शहर रस्ते व रेल्वे मार्गांने महाराष्ट्र व देशाच्या इतर शहरांसोबत जोडले गेले आहे. मुंबई ते चेन्नई दरम्यान धावणारा राष्ट्रीय महामार्ग ४ कोल्हापूर शहरामधून जातो. संपूर्णपणे चौपदरीकरण केलेल्या ह्या महामार्गाद्वारे पुणे, मुंबई तसेच कर्नाटकातील बेळगाव, बंगळूर इत्यादी शहरांपर्यंत जलद वाहतूक शक्य होते. अनेक राज्य महामार्ग कोल्हापूराला कोकणाशी जोडतात. छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरातील प्रमुख रेल्वे स्थानक असून येथून देशाच्या अनेक मोठ्या शहरांपर्यंत रेल्वेगाड्या उपलब्ध आहेत. कोल्हापूर विमानतळ कोल्हापूर शहराच्या ९ किमी आग्नेयेस आहे. सध्या येथून विमानसेवा उपलब्ध आहे.
शिक्षण
कोल्हापूर शहरात खालील शैक्षणिक संस्था नामांकित आहेत येथे दर्जेदार शिक्षण मिळते. त्यामध्ये सायबर(छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एजुकेशन आणि रीसर्च, कोल्हापूर) गेल्या ४० वर्षापासून प्रसिद्ध आहे.हि एकमेव स्वायत्त संस्था आहे ज्याला NAAC A+ मिळाले आहे .आणि ह्या ठिकाणी संशोधन पण होते. पर्यावरण वेवस्तापन या विषयामध्ये एम बी ए व पर्यावरण व सुरक्षा या विषयामध्ये एम्म एस्सी असे नाविन्यपूर्ण पदवीत्तर अभ्यासक्रम इथे उपलब्ध आहेत.इ.स.१९६२ मध्ये स्थापन झालेले शिवाजी विद्यापीठ हे देशातील एक अग्रगण्य विद्यापीठ म्हणून ओळखले जाते. तसेच कोल्हापूर छ. शिवाजी महाराज यांचे नावाने परिपूर्ण व सर्वसामान्यांच्या शिक्षणासाठी शिवाजी विद्यापीठा ची स्थापना महाराष्ट्र शासना ने केलेली आहे जिल्ह्यातील गारगोटी येथे परिपूर्ण शिक्षणाची सोय आहे.
लोकजीवन
संस्कृती
कोल्हापूरच्या संस्कृतीत येथील मराठी चित्रपटांची निर्मिती आणि येथील पहिलवानांची कुस्ती या दोनच गोष्टी प्रामुख्याने आहेत.
चित्रपट
अनेक अजरामर चित्रपटांची कोल्हापूर मध्ये स्वातंत्र्यानंतरच्या काळात झाली.
कुस्ती
एकेकाळी कोल्हापुरात कुस्ती खेळणार्या पहिलवानांच्या सुमारे ३०० तालीमसंस्था होत्या. अन्य राज्यातील मल्ल येथे कुस्ती शिकायला येत, आजही येतात. मात्र आज या ३०० तालीमसंस्थांपैकी जेमतेम ६० तालमी शिल्लक राहिल्या आहेत. त्यांपैकी सुमारे ५२ तालमीच्या जागेचा उपयोग नाच-गाणी रस्सा-मंडळे, राजकीय बैठका, हळदी-कुंकू आदी कार्यक्रम चालतात. उरलेल्या आठ आखाड्यांमध्ये आजही कुस्ती जोशात चालते. ते आखाडे असे :-
१. कसबा बावडा कुस्ती केंद्र
२. खासबाग
३. नवी मोतीबाग तालीम
४. पंत बावडेकर आखाडा
५. मोतीबाग तालीम
६. शाहू आखाडा, चंबूखडी
७. शाहू आखाडा, मार्केट यार्ड
८. शाहूपुरी आखाडा
९. शाहू विजयी गंगावेस
10.कालाईमाम तालिम
खाद्यसंस्कृती
झणझणीत व मसालेदार जेवणासाठी कोल्हापूरची ख्याती आहे.कोल्हापूरची मिसळ,भडंग आणि मटणाचा तांबडा-पांढरा रस्सा हे दोन खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहेत. कोल्हापुरात मिळणारा तांबडा पांढरा रस्सा कुठेच मिळत नाही. कोल्हापूरचा पिवळा धम्मक गूळ आणि मसाले कुटणारे डंख हेही कोल्हापूरचे वैशिष्ट्य. झणझणीत खाद्य संस्कृती कोल्हापूरमध्ये पहावयास मिळते.
अन्य
कोल्हापूरची शुद्ध चामड्याची चप्पल तिच्या वैशिष्ट्यपूर्ण आकारासाठी आणि टिकाऊपणासाठी जगप्रसिद्ध आहे. ही चप्पल बनवताना खिळे वापरले जात नाहीत.हि चप्पल पूर्णपणे चामड्या पासून बनवली जाते.
संगीत महोत्सव
रंगभूमी
कोल्हापूरमध्ये संगीतसूर्य केशवराव भोसले नावाचे नाट्यगृुह आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या इचलकरंजी मध्ये घोरपडे नाट्यगृह देखील आहे.
धर्म- अध्यात्म
कोल्हापूरचे महालक्ष्मीचे मंदिर महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. बाहेरगावचा मराठी माणूस कोल्हापूरला आला आणि मंदिरात गेला नाही असे सहसा होत नाही. मंदिरात इतके खांब आहेत की सामान्य माणूस ते मोजू शकत नाही, असा भाविकांचा समज आहे.कोल्हापूरची शान आहे, महलक्ष्मिचे मंदिर.
कोल्हापूर पासून २२ किमी अंतरावर श्री क्षेत्र जोतीबा (वाडीरत्नागीरी) हे सुप्रसिद्ध देवस्थान आहे. दरवर्षी लाखो भाविक केदारनाथ श्री जोतीबाच्या दर्शनाला येतात.जोतीबा चैत्र याञेला प्रसिद्ध अशी गर्दी असते आणि मंदिरावर गुलालाचा वर्षाव असतो .
प्रेक्षणीय स्थळे
शाहू तलाव व पुरातन शिव मंदीर आणि जागृत हनुमान मंदीर (अतिग्रे) ता. हातकणंगले, जि.कोल्हापूर. श्री व्यंकटेश मंदिर, रूई,ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर
रंकाळा तलाव
पन्हाळगड
महालक्ष्मी मंदिर
भवानी मंडप :छोटे वस्तुसंग्रहालय
ज्योतिबा मंदिर
न्यू पॅलेस : शाहू महाराजांचा राजवाडा व वस्तुसंग्रहालय
टाउन हॉल : छोटे वस्तुसंग्रहालय
दाजीपूर : अभयारण्य
गगनबावडा : हिरवीगार झाडी आणि एक छान धबधबा
विशाळगड : एक सुप्रसिद्ध ऐैतिहासीक ठिकाण
मनोरंजन
केशवराव भोसले नाट्यगृह, कोल्हापूर.
चित्रपटगृहे
INOX* सिनेमा
पीव्हीआर सिनेमा
अयोध्या
अयोध्या चित्रपटगृहाचे पूर्वीचे नाव राजाराम.. याचे बांधकाम छत्रपती राजाराम महाराजांच्या सूचनेनुसार श्री. भोजराज दादासाहेब निंबाळकर यांनी १९३७ साली केले. त्याचे नामकरण १२ एप्रिल १९८६ साली अयोध्या असे करण्यात आले. सध्या या चित्रपटगृहाची क्षमता, बाल्कनी २५४, स्टॉल ३९४ आणि फर्स्ट १०० अशी एकूण ७४८ आहे. येथील ध्वनियंत्रणा ही अत्याधुनिक डॉल्बी तंत्रज्ञानाने युक्त अशी आहे.
ऊर्मिला
ऊर्मिला चित्रपटगृहाचे पूर्वीचे नाव लक्ष्मी. आणि त्याच्याच शेजारी सरस्वती हे चित्रपटगृह. कोल्हापुरातील ताराबाई रोडवर असणारी ही दोन चित्रपटगृहे. ऊर्मिला अर्थात जुन्या लक्ष्मी सिनेगृहाचे बांधकाम नाना बेरी यांनी केले. याचे पूर्वीचे मालक श्री नितीन रेड्डी. त्यांच्याकडून १९९९ साली ’अयोध्या’ चित्रपटगृहाचे मालक दादासाहेब निंबाळकर यांनी ते विकत घेतले आणि त्या नाव ऊर्मिला केले. ऊर्मिला आणि सरस्वती ह्या चित्रपटगृहांचा बाहेर जाण्याचा रस्ता एकच आहे.
सरस्वती
व्हीनस
६ जून १९३१ साली तय्यब अली बोहरा यांनी याचे बांधकाम केले. कोल्हापुरात बांधले गेलेले हे पहिलेच चित्रपटगृह. ह्याच तय्यब अली यांनी व्हीनसच्याच शेजारी अप्सरा हेही सिनेगृह बांधले. आजतागायत दोन्ही चित्रपटगृहांची मालकी बोहरा कुटुंबीयांकडेच आहे. व्हीनसमध्ये ७८३ प्रेक्षक आरामात चित्रपट पाहू शकतात. जिथे व्हीनस उभे आहे तिथे पूर्वी दलदलीची जागा होती. आणि आजही जेव्हा पंचगंगा नदीला जोरदार पूर येतो तेव्हा इथे जाणारा मार्ग बंद पडतो. गेले ५ वर्षे येथे केवळ दक्षिणी भारतीय भाषांतील चित्रपट प्रदर्शित केले जातात. "आर्या" हा इथे आलेला पहिला तेलुगू सिनेमा. ह्या सिनेमाने या चित्रपटगृहात सिल्व्हर ज्युबिली करण्याइतके यश मिळवले. कोल्हापुरात २५ आठवडे चाललेला हा एकमेव तेलुगू सिनेमा. कोल्हापुरात राहणार्या दाक्षिणात्य भारतीय लोकांना तिकडचे सिनेमे पाहण्याचे हक्काचे ठिकाण म्हणजेच व्हीनस.
अप्सरा
. कोल्हापुरात लक्ष्मीपुरीत शेजारी शेजारी ५ चित्रपटगृहे आहेत आणि स्टेशन रोड वर ५. त्यातीलच एक "अप्सरा".. अप्सरा आणि व्हीनस ह्या दोन्हीचे मालक एकच. श्री. तय्यब अली बोहरा. १९४८ च्या सुमारास हे चित्रपटगृह बांधले गेले. याचे पूर्वीचे नाव होते अन्वर. कारण तय्यबअलींच्या तिसर्या मुलाचे नाव होते अन्वर. नंतर याचे नाव झाले लिबर्टी आणि आता याचे नाव आहे अप्सरा..अप्सराची प्रेक्षकक्षमता आहे ६७३.
उषा
१४ जानेवारी १९४७ रोजी नगीनदास शहा यांनी हे चित्रपटगृह सुरू केले. नागीनदास यांच्या दुसर्या मुलीच्या नावानेच (उषा) हे चित्रपटगृह ओळखले जाते. सर्वाधिक हिट चित्रपट देणार्या कोल्हापुरातील काही मोजक्या चित्रपटगृहापैकी एक म्हणजे उषा. "हम आपके है कौन" इथे ६० आठवड्याहून अधिक चालला. इथे लागलेले काही सुपरहिट चित्रपट म्हणजे.. लावारीस, बर्निंग ट्रेन, शोले, लगान, सत्या, तेजाब इत्यादी. या चित्रपटगृहाची प्रेक्षकक्षमता आहे ७८६.
प्रभात
लक्ष्मीपुरीत असणार्या ५ चित्रपटगृहापैकी एक म्हणजे प्रभात. दादासाहेब रुईकर यांनी १९४० साली प्रभात बांधले. याचे प्रेक्षकक्षमता आहे ५३१. २००३ साली प्रभातचे नूतनीकरण झाले. चित्रपटगृह संपूर्णपणे वातानुकूलित करण्यात आले. पारंपरिक फर्स्ट, स्टॉल आणि बाल्कनी अशी आसनव्यवस्था बदलून फर्स्ट, स्टॉल, ड्रेस सर्कल आणि बाल्कनी अशी करण्यात आली. मराठीचे सुपरस्टार दादा कोंडके यांचे ७ सिल्वर ज्युबिली चित्रपट रुईकर यांच्या प्रभात आणि रॉयल मध्येच लागले.
रॉयल
दादासाहेब रुईकर यांचे आणखी एक चित्रपटगृह म्हणजे रॉयल. प्रभातच्या पाठीमागच्या बाजूला वसलेले हे चित्रपटगृह. रॉयलचा बाहेर जायचा मार्ग प्रभातमधूनच आहे. रॉयलची आसनक्षमता ५१३ आहे. याची बांधकाम १९३० चे आहे. २००५ साली या चित्रपटगृहाचे नूतनीकरण करण्यात आले.
शाहू
कोल्हापुरातील मराठी चित्रपटांचे माहेरघर म्हणजे शाहू. गेली कित्येक वर्षाची मराठी चित्रपट प्रदर्शित करण्याची परंपरा आजही तेवढ्याच दिमाखात सुरू आहे. १५ मे १९४७ साली या चित्रपटगृहाचे ओपनिंग झाले. शाहू महाराज व्हीनसमध्ये चित्रपट पाहायला जात असत. पण काहीतरी कारणाने खटका उडाला आणि महाराजांनी स्वतःचे एक चित्रपटगृह बांधले. आणि त्यांच्याच नावावरून याला शाहू नाव पडले.
पद्मा
कोल्हापूरच्या राजकुमारी पद्माराजे यांच्यावरून ह्या चित्रपटगृहाचे नाव " पद्मा" असे पडले. १९४० साली श्री. इंगळे यांनी या चित्रपटगृहाची उभारणी केली. फर्स्ट, स्टॉल, एक्झिक्युटीव आणि बाल्कनी अशी आसनव्यवस्था इथे आहे. इथे एकूण ६९६ प्रेक्षक चित्रपट पाहू शकतात. इथे सॅटेलाईट प्रोजेक्टर आहे.
पार्वती (मल्टिप्लेक्स) - तीन पडदे असलेले गांधीनगरातील चित्रपटगृह
(गणेशसह)
संगम
[३]
पुतळे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा (बिंदू चौक, कोल्हापूर)
शहरात बाबासाहेब आंबेडकर, जोतीराव फुले, शिवाजी महाराज, संभाजी, शाहू महाराज आणि अनेक नामवंत व्यक्तींचे अर्धाकृती व पूर्णाकृती पुतळे जागोजागी उभे करण्यात आले आहेत. त्यांतील काही महत्त्वाचे पुतळे :
अल्लादिया खाँसाहेब पुतळा
आईचा पुतळा
आईसाहेब महाराज पुतळा
आबालाल रहेमान पुतळा
बाबासाहेब आंबेडकर पुतळा (महानगरपालिका परिसर)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा (बिंदू चौक)
वि. स. खांडेकर पुतळा
जिजाबाई पुतळा (के.एम.सी. कॉलेज)
महात्मा गांधी पुतळा (पापाची तिकटी)
महात्मा गांधी पुतळा (साइक्स बिल्डिंग)
चिमासाहेब महाराज पुतळा
ताराराणी पुतळा
ताराराणी पुतळा (ताराराणी विद्यापीठ)
महात्मा फुले पुतळा (बिंदू चौक)
कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा, (एस. टी. स्टँड; शिवाजी विद्यापीठ)
बाबूराव पेंटर पुतळा (पद्मा गार्डन)
राजाराम महाराज पुतळा
शाहू महाराज पुतळा (दसरा चौक)
शाहू पुतळा (मार्केट यार्ड)
शिवाजी महाराज अर्धपुतळा
शिवाजी महाराज पुतळा (शिवाजी चौक)
शिवाजी महाराज पुतळा (शिवाजी विद्यापीठ),
प्रिन्स शिवाजी पुतळा
संभाजी महाराज पुतळा, वगैरे.
खरेदी
कोल्हापुरी चपला
कोल्हापुरी मिरची
कोल्हापुरी साज
कोल्हापुरी चपला-प्रसिद्ध आहे.
कोल्हापुरी फेटा
कोल्हापुरी मिरची
कोल्हापुरी गूळ
परिवहन
ऑटोरिक्षा आणि महानगरपालिकेच्या बसेस
लोहमार्गाने मुंबई, नागपूर, तिरुपती आणि बंगळूरकडे जाणार्या गाड्या दररोज आहेत.
उद्योग
१. घाटगे पाटील उद्योग समूह
२. स्टार उद्योग समूह
३. मेनन उद्योग समूह
४. पॉप्युलर शेती अवजारे
गोकुळ दूध संघ
वारणा दूध संघ
मनुग्राफ इंडस्ट्रीज लिमिटेड, शिरोली एम.आय.डी.सी.
मेनन अँड मेनन,विक्रमनगर
मेनन पिस्टन लिमिटेड, शिरोली एम.आय.डी.सी.
कोल्हापूर स्टील लिमिटेड, शिरोली एम.आय.डी.सी.
श्रीराम फौंड्री,शिरोली एम.आय.डी.सी.
बुधले अँड बुधले लिमिटेड, कुलकर्णी पॉवर टूल्स्, शिरोळ
महाराष्ट्र कार ओल्ड पार्टस, www.caroldpart.com.
ॲटो रिलाईरिसायकलींगकंपनी,www.autorelife.com
सोक्टास इंडिया (वस्त्रौद्योग कंपनी) www.soktasindia.pvt.ltd
साखर कारखाने
१. श्री राजाराम शुगर मिल्स्, कसबा बावडा, कोल्हापूर
२. श्री तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखाना, वारणानगर, कोल्हापूर
३. श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना, शिरोळ, कोल्हापूर
४. श्री कुंभी-कासारी सहकारी साखर कारखाना, कुडित्रे, कोल्हापूर
५.श्री गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना हरळी,कोल्हापूर
६.श्री छत्रपती शाहु सहकारी साखर कारखाना कागल
७.श्री शरद सहकारी साखर कारखाना नरन्दे
८.श्री डी.वाय.पाटील सहकारी साखर कारखाना, गगनबावडा
९.श्री सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखाना, हमीदवाडा
१०.श्री कल्लाप्पाण्णा आवाडे सहकारी साखर कारखाना, हुपरी
११.श्री उदयसिंह गायकवाड सहकारी साखर कारखाना, बाबवडे
१२.श्री पचगगा सहकारी साखर कारखाना,इचलकरजी
१३.श्री बिद्री सहकारी साखर कारखाना, बिद्री
१४.श्री दत्त सहकारी साखर कारखाना, आसुर्ले पोर्ले
१५.श्री गुरुदत्त सहकारी साखर कारखाना, सैनिक टाकळी
१६.श्री हिरण्यकेशी सहकारी साखर कारखाना, आजरा
१७.श्री दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना, हलकर्णी चंदगड
१८. अथणी शुगर्स लिमीटेड , तांबळे भुदरगड
प्रसिद्ध व्यक्ती---
शाहू महाराज
वीर शीवा काशीद
रणजित देसाई
सूर्यकांत मांडरे
चंद्रकांत मांडरे
कुलदीप पवार
भालजी पेंढारकर
व्ही. शांताराम
शिरीष बांदारकर
आशुतोष गोवारीकर
जयंत नारळीकर
संगीतकार,गायक सुधीर फडके
जगदीश खेबूडकर
अभिनेत्री उमा भेंडे
संगीतकार राम कदम
खलनायक राजशेखर
अभिनेता वसंत शिंदे
शिवाजी सावंत
बाबा कदम
डॉ. बापूजी साळुंखे
सुरेश वाडकर
IPS विश्वास नांगरे-पाटील
कोल्हापुरातील पुतळे- कावळा नाका येथील ताराराणी पुतळा, शिवाजी विद्यापीठातील शिवाजी महाराजांचा पुतळा, इत्यादी.
राजर्षी शाहूंची कर्मभूमी महणून कोल्हापूर जिल्हा पुरोगामी महाराष्ट्रास ज्ञात आहे. कोल्हापूर संस्थानाच्या या अधिपतीस महाराष्ट्रातील बहुजन समाजाने आपले दैवतच मानले आहे. शाहूंचा जन्मही कोल्हापूर जिल्ह्यातील कागलच्या घाटगे घराण्यात झाला असल्याने एका अर्थाने कोल्हापूर जिल्हा ही शाहूंची जन्मभूमीही आहे.
राजर्षी शाहूंनी स्थापन केलेली शाहू मिल, त्यांनी वसविलेली शाहूपुरी ही गुळाची बाजारपेठ व त्यांनी बांधलेले राधानगरी हे धरण आजही त्याची स्मृती तेवत ठेवीत आहेत. संतकवी मोरोपंत, ‘ययाती’कार वि. स. खांडेकर, माधव, ज्युलियन, ना. सि. फडके, ‘गीतरामायण’ कार ग. दि. माडगूळकर, ‘मृत्युंजय’काअ शिवाजी सावंत, ‘स्वामी’कार रणजित देसाई याची प्रतिभा येथे बहरली- त्यांचे साहित्य येथेच फुलले.
मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज बाबूराव पेंटर यांनी आपल्या ‘सैरंध्री’ या चित्रपटाद्वारे चित्रपट व्यवसायाची मुहूर्तमेढ कोल्हापुरात रोवली. प्रभात कंपनीही येथेच उदयास आली. मा. विठ्ठल, मा. विनायक, भालजी पेंढारकर, व्ही. शांताराम, यांसारख्या चित्रपटमहर्षीची कलाकारकीर्द येथेच फुलली-बहरली. पुढील काळातही कोल्हापुराने ही परंपर जोपासली. आज महाराष्ट्रातील ‘चित्रगगरी’ हे स्थान कोल्हापुरात प्राप्त झाले आहे. गानसम्राज्ञी, महाराष्ट्रभूषण लता मंगेशकर याही या मातीचीच देणगी होत.
MAHALAKSHMI TAMPLE
JOTIBA(VADI-RATANAGIRI )TAMPLE
NEW PALACE,KPLAPUR
SHALINI PALACE
PANHALA FORT
KANERI MATH
RANKALA LAKE
---------------------------------------------------------------------------------------------------------------
KOLHAPURI BOL.........!
काय रं भाऊ काय रं भाऊ
काय हाय कोल्हापुरात ???
बस भावा सांगतो तुला
काय काय हाय कोल्हापुरात ???
भावा नावाची हाक कोल्हापुरात
नुसत्या नजरंचा धाक कोल्हापुरात
लाल काळी माती कोल्हापुरात
जिवापाडची नाती कोल्हापुरात
गुळाची ढेप , ऊसाचा मळा कोल्हापुरात
जेवणाचा रुबाब , नाद खुळा कोल्हापुरात
तांबडा पांढरा रस्सा आणि
झणझणीत मटण कोल्हापुरात
ताठ कॉलर आणि
वरचं उघडं बटन कोल्हापुरात
लाल मातीची कुस्ती कोल्हापुरात ♂♂♂♂♂♂♂
दुपारच्या झोपेची सुस्ती कोल्हापुरात
रंकाळ्याचं पाणि कोल्हापुरात
साधी सरळ रहाणी कोल्हापुरात
♀✌✌✌✌✌
शिवाजी पेठेचा रुबाब
पेठांचा वट कोल्हापुरात ⚔
मिसळीचा कट कोल्हापुरात
देशप्रेमाचे संस्कार कोल्हापुरात
मोफत अंत्यसंस्कार कोल्हापुरात
उद्यम नगराची कला कोल्हापुरात
⚒⚙⛓⚙⛓⚙⛓⚙⚙⛓
लावणी ची बला कोल्हापुरात
जयप्रभा , शालीनी , प्रभात कोल्हापुरात
भारतीय चित्रपटाची सुरवात कोल्हापुरात
आंबाबाई , जोतिबा , पन्हाळा कोल्हापुरात
मुसळधार पाऊस, गुलाबी हिवाळा कोल्हापुरात ☄☔☔
गणपतिची मिरवणूक करोडचा खर्च कोल्हापुरात
बाजीप्रभुंची खिंड कोल्हापुरात
सिद्दी जोहार ची धिंड कोल्हापुरात
राजा साठी जिव देणारा
शिवा काशिदाचा पिंड कोल्हापुरात
शिवरायांचा इतिहास कोल्हापुरात
शाहुरायांचा आदर्श कोल्हापुरात
कुठं भी फिर जगात भावा
माणुसकीचा परामर्श फक्त कोल्हापुरात
जगात भारी
आम्ही कोल्हापुरी
---------------------------------------------------------------------------------------------------
Non-VEG (TAMBADA -PANDHARA RASA AND MATAN )
Kolhapuri VEG
KOLHAPURI MISSAL
MISSAL PAV
KOLHAPURI BHEL
KOLHAPURI VADA-PAV
KOLHAPURI GUL
-------------------------------------------------------------------------------------------------------------
KOLHAPURI FETA
KOLHAPURI -CHAPPAL
KOLHAPURI SAAZ
ABOUT KOLHAPUR
-----------------------------
Kolhapur Tourism
-----------------------------